Saturday, September 21, 2024
Homeमनोरंजननाटक हे समाजाला सुधारणेचा संदेश आहे - अविनाश स्वामी...

नाटक हे समाजाला सुधारणेचा संदेश आहे – अविनाश स्वामी…

मुंबई – गणेश तळेकर

” बदामाची गोष्ट ” या नाटकाच्या निमित्ताने मंगळवार दि. १२ मार्च २०२४. रोजी ” शिवाजी नाट्य मंदिर ” मध्ये ” अखिल भारतीय भंडारी महासंघ ” चे अध्यक्ष – श्री. नविनचंद्र बांदिवडेकर साहेब खास गोव्यातून नाटक पाहण्यासाठी आले होते.
नाटकाच्या मध्यांतरात त्यांचा सन्मानपूर्वक ” बाळगंगा पडवणे श्रमसंघ ” चे अध्यक्ष – प्रकाश दरवेशी आणि नाट्यसमीक्षक – सु. बा. सरपडवळ यांच्या हस्ते यतोच्छ सत्कार करण्यात आला.

त्याच बरोबर कवी- विसूभाऊ बापट यांचाही सन्मान करण्यात आला आणि श्री. स्वामी समर्थ भक्तभक्त- अविनाश स्वामी यांचा सुध्दा बाळा चौकेकर व किशोर वेल्हे यांच्या हस्ते गौरवपुर्क सत्कार करण्यात आले.

त्याचबरोबर नाटकातील सर्व कलाकारांचा ट्रॉपी देऊन सत्कार करताना समूहाने आनंद व्यक्त केला तेव्हा सदर नाट्यगृहातील रसिक प्रेक्षकांनी हा आनंद पुरेपूर घेऊन ” बदामाची गोष्ट ” नाटकाला छान प्रतिसाद दिला हे टाल्यांच्या कडकडाटात नाटक पाहताना जाणवले! –  अशोक शिंदे

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: