Friday, September 20, 2024
HomeMobileTRAI | आजपासून कॉलिंग आणि एसएमएसचे नियम बदलणार...जाणून घ्या कोणते बदल होणार?...

TRAI | आजपासून कॉलिंग आणि एसएमएसचे नियम बदलणार…जाणून घ्या कोणते बदल होणार?…

TRAI – टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने एक मोठा बदल केला आहे, ज्याची ग्राहक बर्याच काळापासून मागणी करत होते. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ट्रायने फसवणूक कॉल्स आणि मेसेजबाबत एक नवीन नियम जारी केला आहे, जो 1 मे 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू होत आहे. अशा स्थितीत १ मे पासून फेक कॉल आणि मेसेज येण्याचे प्रमाण कमी होईल. पण यामुळे फ्रॉड कॉल्स आणि मेसेजेस बऱ्याच प्रमाणात थांबतील असा विश्वास आहे.

TRAI ने नवीन नियम जारी केले आहेत, ज्याची अंमलबजावणी दूरसंचार कंपन्यांना करावी लागणार आहे. 1 मे 2023 पासून हा नियम लागू करणे बंधनकारक असेल. या कामात AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत ट्रायकडून घेतली जात आहे. यामुळे फोनवरील फेक कॉल्स आणि मेसेज कमी होतील.

कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेंस) स्पॅम फिल्टरप्रमाणे काम करेल, जे बनावट कॉल आणि संदेश फिल्टर करेल. ट्रायच्या आदेशानंतर जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी एआय फिल्टर्स बसवण्याचे काम सुरू केले आहे. एअरटेल 1 मे पासून फिल्टर सिस्टम सुरू करू शकते. जिओला थोडा वेळ लागू शकतो.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: