Thursday, September 19, 2024
Homeसामाजिकटायगर ग्रुप आलापल्ली तर्फे दंतेवाडा मध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली...

टायगर ग्रुप आलापल्ली तर्फे दंतेवाडा मध्ये नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण…

अहेरी – २६ एप्रिल रोजी छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दलाच्या वाहनावर नक्षल्यांनी आयईडी हल्ला केला असून यामध्ये ११ जवान शहीद झाले आहेत. मातृभमीच्या रक्षणासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान, आपल्या शूर सैनिकांचे, भारतमातेच्या शूर सुपुत्रांचे सर्वोच्च बलिदान देशाच्या स्मरणात सदैव अमर राहिल. की ती वेदनादायक घटना देश विसरनार नाही.

विर बाबुराव चौक आलापल्ली येथे टायगर ग्रुप कडून विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कॅण्डल लावून फुल अर्पण करून ५ मिनिटाचे मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली.
अमर रहे ..! अमर रहे..! वीर जवान अमर रहे ..! या जय घोषाने नारे लवण्यात आले. यात गावातील प्रथम नागरिक सरपंच शंकर मेश्राम, गावातील प्रतिष्ठित नागरिक, टायगर ग्रुप नारीशक्ती व टायगर ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: