Sunday, September 8, 2024
spot_img
Homeराज्यरामटेक | भात रोहणीसाठी शेतकऱ्यांना धरणाचे पाणी द्या..!

रामटेक | भात रोहणीसाठी शेतकऱ्यांना धरणाचे पाणी द्या..!

माजी खासदार प्रकाश जाधव यांची मागणी

रामटेक – राजु कापसे

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, पारशिवनी, मौदा तालुक्यात येणाऱ्या परिसरात धान पिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भात रोवणीसाठी धरणाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदनाद्वारे केली आहे…

रामटेक, पारशिवनी या तालुक्यासह मौदा तालुक्यातील अनेक शेतकरी धान पिकाची शेती करतात.सद्यस्थितीत या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी काही शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पाण्याअभावी मृत पावत आहे.म्हणजेच शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाली असून शेतकऱ्यांनी जगावे की मरावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या भागात पेंच,तोतलाडोह आणि खिंडसी असे प्रमुख जलाशय असून या जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांना शेतीच्या उपयोगासाठी देण्यात यावे अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देऊन केली. शेतकऱ्यांना जर पाणी मिळाले तर त्यांचे पीक वाचल्या जाईल व सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माहिती माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिली..

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: