Sunday, September 22, 2024
HomeMarathi News Todayउद्योगपती व टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघातात निधन…पालघरजवळ घडला...

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघातात निधन…पालघरजवळ घडला अपघात…

उद्योगपती तथा टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. पालघरजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मिस्त्री हे चार वर्षे टाटा समूहाचे अध्यक्ष होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ते अहमदाबादहून मुंबईला परतत होते. पालघरजवळील चारोटी येथे पुलावर मर्सिडीज कारचा जबर अपघात झाला. यात सायरस मिस्त्री सह कार चालकाचा मृत्यू झाला पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात सायरस आणि त्याचा ड्रायव्हर ठार झाला तर दोन जण जखमी झाले. त्यांचे वडील आणि मोठे उद्योगपती पल्लोनजी मिस्त्री यांचे या वर्षी २८ जून रोजी निधन झाले. सायरस हे टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष होते. काही वादांमुळे त्यांना चार वर्षांतच अध्यक्षपदावरून हटवण्यात आले. यानंतर रतन टाटा यांनी स्वतः अंतरिम अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. नंतर 2017 मध्ये एन चंद्रशेखरन यांना हे पद देण्यात आले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रायव्हिंग सीटवर एक महिला होती. मिस्त्री बाजूच्या सीटवर बसले होते. मागे आणखी दोन जण बसले होते. अपघात एवढा भीषण होता की कारचा पुढील भाग चक्काचूर झाला. हा अपघात कसा झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: