Sunday, September 22, 2024
Homeराज्यराज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराच्या प्रवेशिका पाठविण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ...

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराच्या प्रवेशिका पाठविण्यासाठी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ…

akl-rto-3

अकोला – संतोषकुमार गवई

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.

या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी, 2024 असा होता.

तथापि, पत्रकारांच्या प्रोत्साहनासाठी प्रवेशिका स्विकारण्यासाठी 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या स्पर्धेत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माहिती व जनसंपर्क विभागाव्दारे करण्यात आले आहे.

राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.inwww.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: