Friday, September 20, 2024
HomeMarathi News Todayचेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता पदाचा दिला राजीनामा…स्टिंग ऑपरेशनमध्ये...

चेतन शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्ता पदाचा दिला राजीनामा…स्टिंग ऑपरेशनमध्ये केले होते मोठे खुलासे…

स्टिंग ऑपरेशननंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. एका स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माने भारतीय संघ आणि खेळाडूंशी संबंधित अनेक खुलासे केले आहेत. यानंतर ते सतत वादात सापडला होते. आता त्यांनी भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्षपद सोडले आहे. चेतन शर्मा यांनी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे राजीनामा पाठवला असून त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. 7 जानेवारी 2023 रोजी त्यांची दुसऱ्यांदा भारतीय संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. तब्बल महिनाभरानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. दोन वेळा भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता बनले होते, परंतु दोन्ही वेळा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही.

चेतन शर्माने एका टीव्ही चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्या नात्यापासून ते खेळाडूंना इंजेक्शन घेण्यापर्यंत अनेक बाबींवर गंभीर खुलासे केले होते. चेतन शर्मा म्हणाले होते की, भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू जेव्हा 80 टक्के तंदुरुस्त असतात आणि 100 टक्के तंदुरुस्त होतात तेव्हा ते इंजेक्शन घेतात. हे वेदनाशामक नाहीत. या इंजेक्शनमध्ये अशी औषधे असतात जी डोप चाचणीत आढळत नाहीत. बनावट फिटनेससाठी इंजेक्शन घेणाऱ्या या सर्व खेळाडूंना बाहेरचे डॉक्टरही आहेत. असे स्टिंग मध्ये खुलासे केले होते.

चेतन शर्माने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेतील स्ट्रेस फ्रॅक्चरमधून बुमराहच्या पुनरागमनावरून त्याच्यात आणि संघ व्यवस्थापनामध्ये मतभेद असल्याचा आरोपही केला होता. बुमराह अजूनही खेळात नसल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतून तो बाहेर पडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही तो खेळताना दिसणार नाही.

कोहली-गांगुली नात्यावरही बोलले
माजी कर्णधार कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोपही चेतन शर्माने केला होता. कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर खुलासा करताना चेतन म्हणाला होता- कोहलीला वाटत होते की सौरव गांगुलीमुळे कर्णधारपद गमवावे लागले, पण तसे नाही. निवड समितीच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये बरेच लोक होते, त्यानंतर गांगुली कोहलीला म्हणाला- निर्णयाचा एकदा विचार करा. मला वाटते की कोहलीने ते ऐकले नाही. मुख्य निवडकर्ता चेतनने अनेक वादग्रस्त दावे केल्याने बीसीसीआयने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. बोर्डाशी करार असताना, कोणत्याही खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही वैयक्तिक विषयावर मीडियामध्ये चर्चा करण्याची परवानगी नाही. चेतनने त्याचे उल्लंघन केले होते. या कारणामुळे त्यांना आता राजीनामा द्यावा लागला आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेनंतर चेतन शर्माच्या नेतृत्वाखालील निवड समिती बरखास्त करण्यात आली होती. या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत हरला आणि निवड समितीच्या अनेक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र, यावर्षी त्यांची मुख्य निवडकर्ता म्हणून पुन्हा निवड करण्यात आली. शर्मा व्यतिरिक्त, शिवसुंदर दास, सलील अंकोला, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) नवीन वरिष्ठ निवड समितीचे इतर चार सदस्य आहेत. चेतनच्या राजीनाम्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य निवडकर्त्याचे पद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे.

भारतीय निवड समिती बरखास्त केल्यानंतर निवड समितीवर नवे सदस्य निवडले जातील, अशी अपेक्षा होती, मात्र जुन्या निवड समितीच्या अध्यक्षांची दुसऱ्यांदा निवड झाल्याने वाद निर्माण झाला होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: