Sunday, September 8, 2024
spot_img
Homeमनोरंजनकेंद्र सरकारने पाठवली शाहरुख, अक्षय आणि अजय देवगण ला नोटीस जाणून घ्या...

केंद्र सरकारने पाठवली शाहरुख, अक्षय आणि अजय देवगण ला नोटीस जाणून घ्या कारण…

न्युज डेस्क – केंद्र सरकारने अवमान याचिकेला उत्तर देताना अलाहाबाद न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाला सांगितले की, गुटखा कंपन्यांच्या जाहिरातींबाबत अभिनेता अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना नोटीस पाठवलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयातही याच मुद्द्यावर सुनावणी सुरू असून, अशा परिस्थितीत याचिका तातडीने फेटाळण्यात यावी, अशी माहिती केंद्राच्या वकिलांनी शुक्रवारी उच्च न्यायालयाला दिली. युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने 9 मे 2024 रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

न्यायमूर्ती राजेश सिंह चौहान यांच्या खंडपीठाने यापूर्वी केंद्र सरकारला याचिकाकर्त्याच्या प्रतिनिधीत्वावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते, ज्यांनी मुळात अभिनेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे असा युक्तिवाद केला होता, परंतु ते गुटखा कंपन्यांच्या जाहिराती करत होते.

22 ऑक्‍टोबरला सरकारला निवेदन देण्यात आले होते, परंतु त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला. यानंतर अवमान याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांना नोटीस पाठवली होती.

शुक्रवारी डेप्युटी सॉलिसिटर जनरल एसबी पांडे यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, केंद्राने अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगण यांना कारणे दाखवा नोटीस पाठवलेली आहे. अमिताभ बच्चन यांनी यापूर्वीच आपला करार रद्द केला असूनही त्याची जाहिरात दाखवणाऱ्या गुटखा कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली होती, असेही न्यायालयाला सांगण्यात आले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: