Thursday, September 19, 2024
Homeराज्य…आणि ते तीन अभियंता बाल बाल बचावले...महिंद्रा कॅम्पर गेली पाण्यात वाहून...

…आणि ते तीन अभियंता बाल बाल बचावले…महिंद्रा कॅम्पर गेली पाण्यात वाहून…

गडचिरोली – मिलिंद खोंड

एटापल्ली नजीक नदीच्या पुराच्या पाण्यातून वाहन काढण्याचा अट्टहास तीन अभियंताच्या जीवावर बेतला असता मात्र वेळीच प्रसंगधान राखून चारचाकी गाडीतून निघाल्याने ते तीन अभियंता बालबाल बचावले.पुराच्या पाण्याच्या प्रवाहात महिंद्रा कॅम्पेर वाहून गेली.

म्हणतात ना काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती..
गडचिरोली जिल्ह्यात मंगळवारी मुसळधार पावसाने कहर केला असतानाच एटापल्ली नजीक बांडे नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते.या पुराच्या पाण्यात सुरजागड लोहप्रकल्प च्या कामावर असलेली महिंद्रा कॅम्पर गाडीतुन तीन मायनींग अभियंता आलापल्ली च्या दिशेने निघाले होते.

मात्र बांडे नदीच्या पुलावर ड्रायव्हरने गाडी घातली पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याने गाडी रस्त्याच्या कडेला वाहून गेले वेळीच प्रसंगवधान राखून या तीन अभियंतांनी गाडीतून उडी मारली आपला जीव वाचविला .हा व्हिडिओ समाजमाध्यमावर वायरल झाला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: